निसर्गाचा गळा घोटून नगरपरिषदेकडून विकासकामे ; विक्रम ढोणे | जत शहरातील नैसर्गिक नाल्यावरील बांधकाम थांबवा

0



जत,प्रतिनिधी : जत शहरातील नैसर्गिक नाल्यावर होत असलेले बांधकाम तातडीने थांबवावे अन्यथा नगरपरिषदेचे विरूध्द हरित न्यायालयात याचिका दाखल करू असा इशारा विक्रम ढोणे व राहूल शिंदे यांनी केला तसे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले आहे. 

जत शहरातील पुर्वीच्या नकाशाप्रमाणे असणारे नैसर्गिक नाले स्वच्छता करून पाणी प्रवाहित करण्याची गरज पाहून शहरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत पुनर्जीवीत करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने पुढाकार घेऊन ओढे नाले स्वच्छ केले होते.











स्वच्छता केलाला शिवाजी पेठेतून वाहणारा नैसर्गिक नाला आता  नगरपरिषद प्रशासनाकडू त्या नाल्याचे नैसर्गिक रूप हटवून त्याला सिमेंट काँक्रीटच्या गटारीमध्ये रूपांतर करित आहे.मात्र त्यामुळे शहरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत नष्ट होणार आहे.जमीनीतून तयार झालेल्या नैसर्गिक ओढा, नाला अथवा नदीच्या पात्रास अडथळा आणणे हे काम घटनेच्या विरूध्द आहे. तो सामाजिक गुन्हा आहे,निसर्गाचा गळा घोटून विकास करता येणार नाही, शासन एकीकडे नैसर्गिक नाले व पाण्याचे स्रोत पुनर्जीवीत करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे.












दुसरीकडे जत नगरपरिषद प्रशासन शासनाच्याच धोरणाला हरताळ फासण्याचे काम करत आहे.शहराच्या भविष्यातील पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी नगरपरिषद प्रशासनाने घेऊन पुर्वीच्या नकाशाप्रमाणे असलेले सर्वच नाले व नाल्यातील चालु असलेले शिवाजी पेठेतील होंडा शोरूम ते रोहिदास नगर येथील बांधकाम तातडीने थांबवावे अन्यथा नगरपरिषदेचे विरूध्द मे.हरित न्यायालय पुणे येथे याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा युवक नेते ढोणे व सामाजिक कार्यकर्ते शिंदे यांनी दिला आहे.

Rate Card









निसर्गाचा गळा घोटून नगरपरिषदेकडून विकासकामे


विक्रम ढोणे : जत शहरातील नैसर्गिक नाल्यावरील बांधकाम थांबवा 

 

जत,प्रतिनिधी : जत शहरातील नैसर्गिक नाल्यावर होत असलेले बांधकाम तातडीने थांबवावे अन्यथा नगरपरिषदेचे विरूध्द हरित न्यायालयात याचिका दाखल करू,असा इशारा विक्रम ढोणे व राहूल शिंदे यांनी केला आहे. 

जत शहरातील पुर्वीच्या असणारे नैसर्गिक नाले स्वच्छता करून पाणी प्रवाहित करण्याची गरज पाहून शहरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत पुनर्जीवीत करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने पुढाकार घेऊन ओढे नाले स्वच्छ केले होते.स्वच्छता केलाला शिवाजी पेठेतून वाहणारा नैसर्गिक नाला आता निम्यापर्यत नगरपरिषद प्रशासनाकडून त्या नाल्याचे नैसर्गिक रूप हटवून त्याला सिमेंट काँक्रीटच्या गटारीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.त्यापुढे दोन्ही बाजूनी अतिक्रमण करून नाला मुजविण्या आला आहे.यामुळे शहरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत नष्ट होणार आहे.जमीनीतून तयार झालेल्या नैसर्गिक ओढा, नाला अथवा नदीच्या पात्रास अडथळा आणणे हे काम घटनेच्या विरूध्द आहे. तो सामाजिक गुन्हा आहे,निसर्गाचा गळा घोटून विकास करता येणार नाही, शासन एकीकडे नैसर्गिक नाले व पाण्याचे स्रोत पुनर्जीवीत करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे.दुसरीकडे जत नगरपरिषद प्रशासन शासनाच्याच धोरणाला हरताळ फासण्याचे काम करत आहे.शहराच्या भविष्यातील पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी नगरपरिषद प्रशासनाने घेऊन पुर्वीच्या नकाशाप्रमाणे असलेले सर्वच नाले मोकळे करावेत,अन्यथा नगरपरिषदेचे विरूध्द मे.हरित न्यायालय पुणे येथे याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा युवक नेते ढोणे व सामाजिक कार्यकर्ते शिंदे यांनी दिला आहे.




जत शहरातील संभाजी चौका दरम्यानचा नाला अतिक्रमण करून छोटा करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.